About Us

पंचकर्म कोणी करावं?

पंचकर्म कोणी करावं?

Image Description

मागील भागात आपण पंचाकर्मांबद्दल जाणून घेतले.यपंचकर्म कोणी करावे? कोणी करू नये हे आपण बघणार आहोत.पंचकर्म अनेक कारणांसाठी केले जाते.रोगानुसार- सर्व रोगांवर अवस्थानुसार विविधपंचकर्मे सांगितली आहेत. उदा- दमा सारख्या विकारात वमन.ऋतूनुसार - ठरावीक ऋतूमध्ये वातावरणाच्या बदलामुळे शरीरातील ठराविक दोष वाढतात. वेळोवेळी ते शरीराबाहेर काढून टाकण्यासाठी काही कर्मे केली जातात. उदाहरणार्थ वसंत ऋतूमध्ये वाढलेला कफ काढून टाकण्यासाठी वमन, वर्षा ऋतूमध्ये वातासाठी बस्ती व शरद ऋतूमध्ये पित्तासाठी विरेचन केले जाते. दर वर्षी ऋतूनुसारपंचकर्म करणे म्हणजे एक प्रकारे शरीराचे सर्व्हिसिंग करण्यासारखेच आहे.गर्भधारणेपूर्व-गर्भधारणेत अडचण येत असल्यास किंवा उत्तम संतती निर्मितीसाठी कुटुंबाचे नियोजन करत असताना पंचकर्म करून घेणे अतिशय फायद्याचे ठरते.पंचकर्माचे फायदे- पंचकर्म केल्यामुळे भूक चांगली लागते, पचन सुधारते, शरीराला आणि मनाला स्वस्थता मिळते, मन आणि बुद्धी आपापल्या कार्यामध्ये उत्कर्ष करतात, शरीराचा वर्ण, कांती यामध्ये सुधारणा होते, कार्यशक्ती अर्थात स्टॅमिना वाढतो, वृद्धावस्था लवकर येत नाही, निरोगी असे दीर्घायुष्य मिळते व जुनाट व्याधी कायमचे नष्ट होतात.पंचकर्म कोणी करू नये- पंचकर्म उपचार करत असताना व पंचकर्मझाल्यानंतर जेरुग्ण आहार विहाराचे पथ्यपाळू शकणार नाहीत,अति धाडसी किंवाअति घाबरट रुग्ण, ज्या रुग्णांचे बल कमी झाले आहे, असाध्य रोग पीडित रुग्ण, ज्यांचे वय 60 वर्षांपेक्षा जास्त आहे व ज्यांना खूप थकवा आहे असे रुग्ण यांनी पंचकर्मे करू नयेत अथवा गरज असल्यास तज्ञ वैद्यांच्या देखरेखीखाली करावीत.लक्षात ठेवा, पंचकर्म ही जाता येता करण्याची गोष्ट नाही. उत्तम वैद्याबरोबरच उत्तम रुग्णाची साथही पंचकर्म करताना गरजेची असते. पंचकर्म करताना दिलेल्या सूचनांचे नीट पालन झाले नाही तर शरीरावर विपरीत परिणाम होऊ शकतात. त्यामुळे पंचकर्म हे नेहमी तज्ञ वैद्याच्या सल्ल्याने आणि त्यानी दिलेल्या सूचना तंतोतंत पाळूनच करावे.पुढील भागामध्ये पंचकर्म सुरू करण्याच्या आधी शरीराची कशी तयारी करून घेतली जाते ते आपणबघूया.धन्यवाद.वैद्य प्रभाकर यशवंत शेंड्येयशप्रभा आयुर्वेद व पंचकर्म चिकित्सालय पुणे ५२drshendye@gmail.com