LOKSATTA PANCHAKARMA ARTICLES लोकसत्ता लेखमाला

बस्ति - अर्ध चिकित्सा

बस्ति भाग 1वमन विरेचन नंतर बस्ति हे कर्म येते. बस्ति या उपक्रमाला आयुर्वेदात अनन्यसाधारण महत्त्व आहे.बस्ति हे वात दोषावर केलेला उपचार आहे. सर्व दोष हे शरीरात वातामुळे पसरत असतात त्यामुळे वातावर बस्ति मुळे नियंत्रण आल्यामुळे अर्धी चिकित्सा होते असे आयुर्वेदात वर्णन आहे. बस्ति हे कर्म तान्ह्या बालकापासून शंभर वर्षापर्यंत कोणालाही केले जाऊ शकते.

बस्ति म्हणजे कायबस्ति म्हणजे गुरुद्वारा द्वारे शरीरामध्ये औषधी द्रव्य तेल अथवा काढा प्रवेशित करणे. त्याकाळी ही क्रिया करण्यासाठी बकऱ्याचा मुत्राशय अथवा बस्ति वापरला जायचा यामुळे या कर्माला बस्ति असे नाव पडले आहे

बस्तिचे प्रकार-बस्ति चे दोन प्रकार आहेत अनुवासन बस्तिव निरुह बस्ति

बस्ति करावयाचा कालवर्षा ऋतू मध्ये म्हणजेच जुलै ऑगस्ट महिन्यामध्ये वात वाढल्यामुळे याकाळात बस्ति करणे उत्तम ठरते याशिवाय रोगाच्या विशिष्ट अवस्थेमध्ये वर्षभरात केव्हाही बस्ति करता येते

कालावधीरोगाप्रमाणे अथवा रोग याप्रमाणे आठ दिवस पंधरा दिवस वा तीस दिवसही बस्ति करता येतो,सर्वसाधारणपणे सलग ८ दिवसांचा बस्ति सध्या केला जातो यालाच योग्य बस्ति क्रम असे म्हणतात.

या भागात आपण अनुवासन अथवा तेल बस्तिचाविचार करू.

अनुवासन म्हणजेच स्निग्ध द्रव्य आणि जसे तेल तूप इत्यादी द्रव्यांनी दिलेला बस्ति.सध्या सर्व साधारणपणे 40 ते 150 मिली पर्यंत औषधी तेल बस्ति साठी वापरले जाते.

बस्ति विधि.जेवण झाल्यावर वा न्याहारी झाल्या नंतर अनुवासन बस्ति दिला जातो. बाह्य स्नेहन व स्वेदन करून घेतले जाते व नंतर रुग्णांना डाव्या कुशीवर झोपवले जाते, उजवा पाय पोटाच्या जवळ घेऊन डावा पाय लांब सरळ ठेवला जातोत्यानंतर रुग्णाच्या गुद भागाला तूप लावले जाते नंतर रबर कॅथेटर अथवा बस्ति नेत्र गुदात प्रवेशित केले जाते .यानंतर समान जोर देऊन आत तेल सोडले जाते.बस्ति दिल्यानंतर सर्वसाधारण दिड ते दोन तासानंतर संडासला लागण्याची भावना निर्माण होते व थोडेतेल व मलबाहेर पडतो.

बस्ती चालू असताना च्या काळात उन्हात फिरणे, पावसात भिजणे, जागरण, प्रवास, अति व्यायाम, ज्यामुळे शरीराला थकवा येईल अशा गोष्टी टाळाव्या

पुढील भागात आपण बस्ती चे फायदे व बस्ती कोणी करावा हे बघू.

बस्ति भाग 2मागील भागात आपण अनुवासन बस्तिम्हणजे काय हे पहिले आता काढा बस्ति म्हणजेच निरूह बस्ति विषयी माहिती घेऊ.ज्या बस्तिमध्ये काढ्याचे प्रमाण अधिक असते त्याला निरुह बस्ति असे म्हणतातयालाच आस्थापन बस्ति म्हणतातनिरूह याचा अर्थ शरीरातून दोषांना बाहेर काढून टाकते. व आस्थापन याचा अर्थ शरीरातील धातूवाढवून आयुष्य टिकवण्याला मदत करणे

बस्ति चिकित्सेला आयुर्वेदात अर्धी चिकित्सा मानली आहे त्यामुळे बहुतांश रोगामध्ये बस्तिचिकित्सा करता येते.१)सर्वे प्रकारचे वात रोग२) ज्या रोगामध्ये बळ वाढवण्याची गरज आहे३)पाठदुखीकंबर दुखी इत्यादीया शिवाय जवळ जवळ सर्व रोगामध्ये बस्तिचिकित्सा करता येते.

बस्तिविधीनिरूह बस्तिमध्ये मध, सैधव,तेल, औषधी वनस्पतींचा कल्क म्हणजेच चटणी आणि काढा हे घटक वापरले जातातयातील प्रत्येक द्रव्याचे प्रमाण हे रोग व अवस्था यानुसार ठरवले जाते.काढा बस्तिचे प्रमाण हे ९६०मिली पर्यंत देता येते. रुग्णाच्या व रोगाच्या अवस्थेनुसार हे प्रमाण ठरवले जाते.कोमट असा काढा मध तेल सैंधव असे मिश्रण एकजीव होई पर्यंत घोटले जाते.निरूह बस्तिदेण्याच्या आधी रुग्णाला स्नेहान स्वेदन व अनुवासन बस्ति दिला जातो.आधीचा आहार पूर्ण पचला आहे अशा वेळेस हा काढ्याचा बस्ति देतात.बस्ति देताना डाव्या कुशीवर झोपवले जाते.हे मिश्रण बस्तिपुटक मध्ये घालून ते आत प्रवेशित केले जाते.या नंतर कॅथेटर गुद भागातून प्रवेशित केला जातो. व समान जोर देऊन बस्ति दिला जातो.

हे मिश्रण पूर्ण आत गेले असता रुग्णाला १ मिनिट तसेच झोपवून ठेवले जाते.नंतरशौचाची भावना झाली असता मल वेग उत्सर्जित होतो.प्रथम काढा व नंतर मल बाहेर पडतो.बस्ति देत असताना मध्ये जर मल वेग आला तर बस्ति थांबवून नंतर परत दिली जाते.

योग्य बस्तीचे लक्षणमल पित्त कफ वात बाहेर पडून जाणेशरीर हलके वाटतेजेवणांमध्ये रुची उत्पन्न होते.बळ वाढतेरोगाची तीव्रता कमी होते.पुढील भागात आपण बस्ति चिकित्सा याचे फायदे व पाळावयाचे नियम हे बघु.